बीड - माजलगावमध्ये दर 3 महिन्याला बैठक घेणार, असं म्हणता. मग पाच वर्षं पालकमंत्री होता, तेव्हा किती वेळा माजलगावमध्ये आलात, असा सवाल आमदार सोळंकेंनी पंकजा मुंडेंना विचारला आहे. माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह भाजपा स्वबळावर लढत आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या सभेदरम्यान दर तीन महिन्याला माजलगावच्या नगरपरिषदेची बैठक घेणार, असे म्हटले होते. यावर रात्री प्रचार सभेदरम्यान बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री पंकजा मुंडेंवर टीका केलीय. दर तीन महिन्याला माजलगावमध्ये बैठक घेणार म्हणता. ताईसाहेब तुम्ही पाच वर्षं पालकमंत्री होता, किती वेळा माजलगावला आलात. पाच वर्षांत एखादी बैठक घेतली का? माजलगावसाठी आणि आता कुठल्या तोंडाने सांगताय. मागच्या काळामध्ये तीन महिन्याला तुम्ही परळीला गेला असता तर परत जिंकला असतात, पण तुम्ही तिथे गेला नाहीत. कशाकरिता खोटी आश्वासनं देता, असे म्हणत टीका केलीय.
Be the first to comment