Skip to playerSkip to main content
  • 3 months ago
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत धडकले आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था महानगरपालिकेत नोकरी करणाऱ्या मराठा समाजाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यांनी मराठा बांधवांसाठी चहा, बिस्कीट, जेवण, पाण्याची सोय केली आहे. त्याबद्दल मराठा बांधव कृतज्ञता करताना दिसत आहेत. "आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही" अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानं काही काळ वाहतूक खोळंबली होती. पाण्याच्या टँकरची व्यवस्था होताच सर्व आंदोलकांनी रस्ता मोकळा केला. रविवार असल्याने  एक दिवस समाजासाठी अशी भावना मनात ठेवून मुंबईमधील मराठा बांधव देखील आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. तिसऱ्या दिवशीदेखील आंदोलकांमधील उत्साह जराही कमी झालेला नसून 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणांनी मुंबई हादरून गेली आहे.  

Category

🗞
News
Transcript
00:00The
00:04The
00:10The
00:13The
00:15The
00:17The
00:20The
00:23The
Be the first to comment
Add your comment

Recommended