रत्नागिरी- गेले तीन दिवस पडणाऱ्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यासाठीची चांगली वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रत्नागिरीतील शीळ धरण हे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे हे धरण तुडुंब भरलेले दिसून येत आहेत. रत्नागिरी शहराचा पाण्याचा प्रश्न मिटलेला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील कोसळणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला आहे. धरण भरल्याने शहराला पाणीपुरवठा करण्याचा कालावधीही देखील वाढवला जाणार आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे रत्नागिरी शहरातील शीळ धरणाचा 90 टक्के पाणीपुरवठा हा रत्नागिरी शहराला होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणीसाठ्यात ही चांगली वाढ दिसून येत आहे. दापोलीतील सुकवंडी पंचनंदी ही धरण देखील 100 टक्के भरलेली पाहायला मिळत आहेत, तर 20 धरणं 50 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेली पाहायला मिळत आहेत. धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्हावासीयांची पाणी पिण्याचे टंचाई मिटली असून, बळीराजासह सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Comments