पहलगाम (श्रीनगर)- 1995 चा काळ काश्मीर पर्यटनासाठी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होता. 1990 च्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार शिगेला पोहोचला होता. सततचे दहशतवादी हल्ले, अपहरणाच्या घटना आणि अस्थिर सुरक्षा परिस्थितीमुळे देश-विदेशातील पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली होती. त्या काळात काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. त्या काळात काश्मीरला महाराष्ट्रातून सहल आणण्याचं धाडस राजाराणी ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा राजा पाटील यांनी दाखवलं. ती सहल सुरक्षित पद्धतीनं यशस्वी करण्यात आली. त्यानंतर काश्मीर पर्यटनाला उभारी मिळाली. या सहलीबद्दल आजही काश्मीरमध्ये बोललं जातं. त्यासाठी पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्यानंतर पर्यटनाला उभारी मिळावी, यासाठी काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देशातील 60 टूर कंपन्यांना पर्यटनाला उभारी देण्यासाठी आमंत्रित केलं. त्याचं नेतृत्व राजाराणीचं टूर्सने केलं होतं. काश्मीरचं पर्यटनाबाबत राजाराणी ट्रॅव्हल्सचे मालक आणि राजा पाटील यांचे पुत्र विश्वजीत पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बातचीत केली. 22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर पर्यटक कमी झाले होते. ही स्थिती सावरत असताना अमेरिका-इराण युद्ध झाले. एप्रिल ते जुलैमध्ये रुम मिळत नव्हत्या. सध्या केवळ 40 टक्के 40 रुम बुक असल्याचं विश्वजीत पाटील यांनी सांगितलं.
Comments