Skip to playerSkip to main content
  • 2 days ago
पुणे (मावळ) : जैन धर्मातील ज्येष्ठ साध्वी आणि 'वीरायतन' संस्थेच्या संस्थापिका, पद्मश्री आचार्य श्री चंदना जी ('ताई माँ') यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं पार्थिव पुण्यातील वर्धमान प्रतिष्ठान रोड इथं दर्शनासाठी ठेवलं होतं. या ठिकाणी हजारो नागरिक, अनुयायी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अंतिम दर्शन घेतलं. अत्यंत शांत आणि भावनिक वातावरणात सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर वडगाव मावळ येथील अभय प्रभावना इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी देशभरातील जैन धर्मगुरू, साध्वी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. अंत्यसंस्कार अत्यंत भावनिक वातावरणात पार पडले. यावेळी अनेकांनी अश्रुपूर्ण निरोप देत त्यांच्या कार्याची आठवण जागवली. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून त्यांच्या समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Category

🗞
News
Transcript
00:28Oh
Comments

Recommended