धुळे - राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना घेराव घालण्यात आला. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना दिलेल्या आश्वासनांच्या संदर्भात जाब विचारत अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसंच जरांगे यांच्या प्रकृतीची सरकारनं काळजी घ्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. मराठा समाजाच्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेत असून पंधरा मागण्यांपैकी जवळपास 13 मागण्या पूर्ण झाल्या. तसंच उर्वरित दोन मागण्यांवर आज सायंकाळपर्यंत तोडगा निघेल अशी माहिती सामंत यांनी दिली. त्याचबरोबर आज पहाटे तीन वाजता जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलणं झालं असून त्यांच्या तब्येतीची देखील काळजी सरकार घेत असल्याचा दावा करत मंत्री उदय सामंत यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आश्वासित केलं.
Comments