Skip to playerSkip to main content
  • 3 months ago
रायगड :  गेली 17 वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथे टोल (Kharpada Toll) वसुली सुरू करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पत्रकार संघटना, मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्यावतीनं आज खारपाडा टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. टोल वसुलीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पत्रकारांनी काही काळ कोकणाकडं जाणाऱ्या मार्गावरील टोल वसुली बंद पाडली. “महामार्ग पूर्ण करा, मगच टोल सुरू करा” आणि “अपूर्ण रस्त्यावर टोल का?” अशा घोषणा देत पत्रकारांनी शासनाचा निषेध केला. रायगड प्रेस क्लबचे संस्थापक तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी यावेळी शासनावर जोरदार टीका केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक वर्षांत अडीच हजारांहून अधिक प्रवासी आणि पर्यटकांना अपघातात जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांनी केला. या दुर्घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारत शासनाने पुढील किमान दहा वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील टोल माफ करावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

Category

🗞
News
Transcript
00:00Salat Pajai
00:01Salat Pajai
00:02Salat Pajai
00:05Piazza
00:07Hamar getta kam
00:10Hamar getta kam
00:11Reykade Shirtuan
00:14Reykade Shirtuan
00:16Hamar getta kam
00:18Yarab mati are here
00:19Van da da
00:20Van da da
00:23Van da da
00:23Van da da
00:24Thank you very much.
01:23Thank you very much.
01:52Thank you very much.
02:21Thank you very much.
02:52Thank you very much.
Comments

Recommended