नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित मानहानी प्रकरणात नाशिकच्या न्यायालयानं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयानं या प्रकरणातील सर्व कार्यवाही अधिकृतपणे रद्द केली आहे. अशा स्थितीत या प्रकरणाचा अंतिम निपटारा झाला आहे. या प्रकरणातील संपूर्ण कार्यवाही समाप्त झाल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जयंत जायभावे यांनी दिली.
Comments