सोलापूर : हैदराबाद येथील भाषणात पंतप्रधान (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांना वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि घरगुती गॅसऐवजी सौरऊर्जेचा वापर करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या वक्तव्यावर सोलापूरातील सराफ व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “वर्षभर सोने खरेदी करू नका म्हणाल, तर आम्ही जगायचं कसं?” असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय. सराफ व्यापारी महेश धाराशिवकर यांनी हिंदू धर्मात सोन्याला विशेष महत्त्व असल्याचं सांगत, “मंगळसूत्राशिवाय हिंदू संसार सुरू होत नाही. मग मोदींना त्याचं महत्त्व माहिती नाही का?” असा प्रश्न उपस्थित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू धर्माचा पुरस्कार करतात. एखाद्या हिंदू बंधू किंवा बहिणीचा संसार सुरू करताना, गळ्यात मंगळसूत्र असल्याशिवाय संसार सुरू होत नाही, हे नरेंद्र मोदींना माहिती नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. तसेच निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर इंधन वापरून आता पेट्रोल-डिझेल वाहने टाळण्याचं आवाहन केल्याबद्दलही त्यांनी टीका केली.
Comments