Skip to playerSkip to main content
  • 8 months ago
पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणानंतर राज्यभर पुन्हा एकदा हुंडाबळीची तसेच लग्नात होणाऱ्या मोठ्या खर्चाची चर्चा जोरदार होताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात लग्नात लाखोंचा खर्च करून आपली प्रतिष्ठा दाखवण्याचे प्रयत्न केले जातं आहेत. दरम्यान, मराठा समाजानं बैठक घेत आगामी काळात समाजात होणाऱ्या लग्नांसाठी एक आचारसंहिता जाहीर केली आहे. मुलांच्या लग्नापूर्वी त्यांच्याशी आईवडिलांचा खुलेपणाने संवाद होणे आवश्यक आहे. लग्न वेळेवर लावावीत, ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो त्या कुटुंबाशी रोटी-बेटी व्यवहार करणार नाही, सत्कार समारंभ थोडक्यात व्हावेत, स्टेजवरील गर्दी कमी व्हावी, मिरवणुकांना आवर घालावा, स्वागत समारंभाला प्राधान्य द्यावे, अनावश्यक खर्च टाळावेत, लग्न साधेपणानं व्हायला पाहिजे, मुलीवर अन्याय होत असेल तर मुलीच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे यासह अशा अनेक मुद्द्यांवर आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. या आचारसंहितेचं स्वागत तरुण- तरुणींकडून करण्यात येत असून, समाजानं जो काही निर्णय घेतला आहे तो योग्य असून आम्ही समाजाच्या मागे उभे असल्याचं तरुणांनी सांगितलं.

Category

🗞
News
Transcript
00:00the
00:01government
00:06foreign
00:11foreign
00:17foreign
00:20foreign
00:29Thank you very much.
00:59Thank you very much.
09:45Thank you very much.
10:15Thank you very much.
Be the first to comment
Add your comment

Recommended