Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
मनसे आमदार राजू पाटील आज महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी पालिकेच्या आयुक्तांना सल्ला दिला. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. पण माझा त्यांना एक हितचिंतक म्हणून सल्ला आहे. झेपत नसेल तर इथून सोडून जा, तुम्हाला जी खुर्ची सोयीस्कर असेल ती पकडा. कशाला तुमचे आणि आमचे हाल? तुम्ही का भेटत नाही, त्यामागे कोणाचा दबाब येतो का असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कलेक्टर म्हणून त्यांचे काम चांगले होते असं ही ते यावेळी म्हणाले.

Category

🗞
News
Comments

Recommended