Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/26/2022
भारत ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. भारताच्या प्रजासत्ताकाला एवढे वर्ष उलटूनही देशात काही मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतीये. सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात मुली जीवाची बाजी लावून दररोज कसरत करत जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी शाळेत जातायेत. महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र याच जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय ही या जिल्ह्यातील सत्य परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात खिरखिंड या गावातील मुलींना होडीने प्रवास करुन शाळेत पोहोचावं लागतं. हा त्यांचा रोजचाच दिनक्रम आहे. कोयना धरणाचा विशाल जलाशय पार करत त्यांना ही छोटीशी लाकडाची होडी स्वत:च चालवत शाळेत जावं लागतं.

Category

🐳
Animals

Recommended