Skip to playerSkip to main content
  • 15 minutes ago
रायगड- मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अक्षरशः त्रासदायक ठरला आहे. दिवा येथून शनिवारी रात्री 10 वाजता कोकणाच्या दिशेने निघालेली एसटी बस रविवारी सकाळी साडेआठ वाजले तरी माणगावमध्ये पोहोचलेली नाही. अवघ्या तीन ते चार तासांच्या प्रवासासाठी तब्बल 12 तास लागत असल्याने प्रवाशांचा संताप वाढला आहे. माणगाव, इंदापूरसह महामार्गावरील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रात्रभर बसमध्ये अडकून पडल्यानं महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असले तरी वाहनांची संख्या मोठी असल्यानं कोंडी कायम आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर अशीच परिस्थिती निर्माण होते. मात्र, यंदाही चाकरमान्यांना साधारणत: 12  तास वाहतूक कोंडीत अडकून प्रवास करावा लागत असल्यानं प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोकणातील राजकारण्यांकडून आणि प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्यानं कोकणवासीयांचा संताप आता उफाळून येताना दिसत आहे. 

Category

🗞
News
Transcript
00:06foreign
00:12foreign
00:14We had a bus.
00:16At least 4.
00:18There are only 4 bus.
00:22We have a bus there.
00:22The operation has a bus.
00:26These agencies,
00:29the workers,
00:30the hospital is calling the hospital.
00:35Guys,
00:38the hospital is a physician.
00:39The workers had the hospital.
00:45foreign
Comments

Recommended