पुणे: भारतानं न्यूझीलंड संघाला पराभूत करून आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर पुण्यात क्रिकेटप्रेमींना जल्लोष साजरा केला. 2026 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारतानं विजय मिळवत तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. दोन्ही संघांमधील हा विजेतेपदाचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना 255 धावा केल्या तर न्यूझीलंड संघाने 159 धावा केल्या होत्या. टी-20 विश्वचषकमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतर पुण्यातील गुडलक चौक येथे फटाके फोडत भारतीय तिरंगा हातात घेत आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी पुण्यातील गुडलक चौक येथे उपस्थित होते. यावेळी 'भारत माता की जय'चा जयघोष करण्यात आला.
Comments