भाजपचे खूप आमदार येऊन आम्हाला भेटतात, त्यांच्यातही काही अलबेल नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही. भाजपच्या विरोधात कसं उत्तरं द्यायचं यावर आम्ही चर्चा करु. आपल्या नेत्यांशी भेटून राजकीय चर्चा करणं यात काही चुकीचं नाही, असंही नाना पटोले म्हणाले. भाजपला राज्यातील सरकार नको आहे, म्हणून अश्या खोट्या बातम्या देतात. आम्ही एकच लोह्याची मारु असा इशारा देखील पटोले यांनी दिली
Be the first to comment