Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
#TuljapurShrine #Railway #CentrelGovernment #MaharashtraTimes
तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्यासाठी आजपर्यंत अनेक बैठका झाल्या परंतु, याची यामुळे प्रत्यक्षात काहीच झालं नाही.तुळजापूरच्या रेल्वेमार्गासाठी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी सोलापूर लगत हा मार्ग करण्याचे निर्देशित केले होते.तुळजापूर तीर्थक्षेत्राऐवजी लातूर- कुर्डुवाडी हा रेल्वे मार्ग झाला. मात्र तुळजापूर तीर्थक्षेत्रावर रेल्वेबाबत सातत्याने अन्याय झालेला आहे.खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. सुरवातीला सर्व्हेक्षणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झालेले आहे. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्य सरकारच्या वतीने परिवहनमंत्र्यांनी विधानसभेत योग्य माहिती न दिल्याने हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचे नुकतेच घोषित केलेले आहे.
आर्थिक दृष्ट्या फायदेशीर प्रकल्प होण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी पावले उचलण्याची अपेक्षा तुळजापूरकरांना आहे.

Category

🗞
News

Recommended