Ganesh Visarjan 2022 | काल विसर्जनानंतर आज समुद्रकिनारी साफसफाई मोहीम | Sakal Media

  • 2 years ago
अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यातील सर्वत्र गणपती विसर्जन झालं गणपती विसर्जनानंतर भरती ओहोटीमुळे गणेशमूर्तींचे अवशेष, निर्माल्य किनाऱ्यावर येऊन पडतं. मनसेकडून मुंबई, रायगड, रत्नागिरीत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुंबईतील दादरच्या समुद्रकिनारी खुद्द अमित ठाकरेंनी या मोहिमेत सहभाग घेतला. वाळूत रुतलेले गणेशमूर्तींच्या अवशेषासह निर्माल्याचा कचरा उचलून त्यांनी किनारा स्वच्छ केला. ते साफ करण्यासाठीच आज मनसेकडून 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' ही मोहीम राबवण्यात आली.