Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/18/2022
टीम इंडियानं राजकोटच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत दक्षिण आफ्रिकेचा ८२ धावांनी धुव्वा उडवून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या आजवरच्या इतिहासात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर १७० धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताच्या प्रभावी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव ८७ धावातच आटोपला. भारताकडून आवेश खाननं १८ धावात चार फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Category

🗞
News

Recommended