आबलोली : गुहागर तालुक्यातील कुडली - ब्राह्मणवाडी येथील लक्ष्मीनारायण रत्नेश्वर मंदिरात कार्तिक महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात साजरा होणाऱ्या लक्ष्मीनारायणाच्या उत्सवात देवाच्या नैवेद्याचे पाच वडे उकळत्या तेलातून हाताने काढण्याची परंपरा आजही जपली जात आहे. यावर्षी उकळत्या तेलातून वडे काढण्याचा मान अमोल अनंत निमकर यांना सर्वानुमते मिळाला होता.
फार प्राचीन असणाऱ्या लक्ष्मीनारायण रत्नेश्वर मंदिराचा पहिला जीर्णोद्धार निमकर मंडळींकडून १८७२ साली करण्यात आला होता. गेल्या दीडशे वर्षांपासून देवाच्या नैवेद्यासाठी लागणारे पाच वडे उकळत्या तेलातून हाताने काढण्याची परंपरा आजही अविरतपणे जपली जात आहे. कार्तिकी एकदशी उत्सवात त्रयोदशी दिवशी प्रसादाचे पाच वडे उकळत्या तेलातून काढतात. ते काढताना देवाच्या तीर्थात हात बुडवतात. त्यामुळे वडे काढणाऱ्या व्यक्तीचे हाताला काहीही दुखापत होत नाही.
पाच वड्यांच्या पुढे सहावा वडा तेलातून काढण्याचा प्रयत्न कुणीही करीत नाही. या प्रथेला आव्हान देण्यासाठी काही मंडळींनी या दिवसाव्यतिरिक्त उकळत्या तेलातून वडे काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना प्रायश्चित्त मिळाल्याचे ग्रामस्थ सांगतात. हे वडे काढणे पुण्याचे काम असून, निमकर मंडळींकडून सर्वानुमते प्रतिवर्षीचा मानकरी निवडला जातो.
श्री लक्ष्मीनारायणाच्या नावाने निमकर मंडळींचे विविध असणारे फंड ५ जानेवारी १९४८ रोजी एकत्र येऊन लक्ष्मीनारायण फंड, मुंबई अशा एकाच फंडाची नोंदणी करण्यात आली. या ब्राह्मणवाडीत कायमस्वरुपी राहणाऱ्या कुटुंबाची संख्या कमी असली तरी या उत्सवानिमित्त देश-परदेशातील सर्व निमकर कुटुंबिय याठिकाणी हजेरी लावतात. या देवस्थानला ब्रिटीशांची सनद असल्याचे सांगितले जाते.
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ?
Comments