वैभव गायकर , पनवेल :मेक इन इंडियाअंतर्गत देशांतर्गत उत्पादनाला विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. प्रत्यक्षात मात्र देशाच्या ग्रामीण भागात आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना आजही अपेक्षित बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे या वस्तूंची विक्री करण्यासाठी या कारागिरांना पायपीट करावी लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील पाच कुटुंबांनी तयार केलेल्या शोभेच्या वस्तू विकण्यासाठी सुमारे १४०० किमीचा प्रवास करून नवी मुंबई गाठली आहे. सध्या खारघरच्या रस्त्यावरच संसार थाटून वेतापासून विविध शोभेच्या वस्तू बनवून आपली उपजीविका करणाऱ्या या कुटुंबांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
Subscribe Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Comments