Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शिरपूर जैन - गेल्या ४ वर्षांपासून गवळी समाजाच्यावतीने येथे सुरू करण्यात आलेली सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम असून, २२ एप्रिल २०१८ रोजी २४ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. मागील काही वर्षांपासून लग्न सोहळ्यात झगमगाट, बँण्डबॉजा, खानावळी, आहेर आदिंवर खर्च करण्याची प्रथाच रुढ झाली आहे. शिरपूर जैन येथील गवळी समाजाने मात्र या प्रथेला फाटा देऊन सामुहिक विवाह सोहळ्याची आदर्श पद्धती अवलंबली आहे. गेल्या ४ वर्षांपासून या ठिकाणी गवळी समाजाच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यावर्षीदेखील या सोहळ्यात २२ एप्रिल रोजीच २४ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.  २४ वधूंना प्रत्येकी १६ तोळे चांदी देण्यात आली. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सर्व गवळी समाजबांधवांनी परिश्रम घेतले.


Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Comments

Recommended