छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणी अपशब्द काढले, तर त्याला आधी महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे अशा शब्दांत खासदार युवराज संभाजी राजे यांनी अहमदनगरच्या छिंदम प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रा सह दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह असताना अशा पद्धतीचं वक्तव्य सत्ताधारी पक्षाचे उपमहापौर करतात, तुम्ही आता भाजपचे सहयोगी खासदार आहात, त्यावर तुमची प्रतिक्रिया आहे असा प्रश्न विचारला असता, संभाजीराजेंनी माझ्यासाठी छत्रपती शिवराय हा विषय पक्षाच्या पलीकडचा आहे असं सांगत वरील प्रतिक्रिया दिलीय.असल्या माणसांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही, त्यानी आता जरी माफी मागितली असली तरी नुसत्या माफीनं खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments