भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २०१ धावांत गुंडाळून,७३ धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशी विजयी आघाडी घेतली.या मालिके तील अखेरचा आणि सहावा वन डे सामना १६ फेब्रुवारी सेन्चुरियनमध्ये खेळला जाणार आहे. केवळ औपचारिकता म्हणून उरलेल्या या सामन्यात विजयाच्या इराद्याने मैदानात उतरु, असं कर्णधार विराट कोहलीने अगोदरच स्पष्ट केलं आहे. 'आमची ५-१ ने आघाडीवर राहण्याची इच्छा आहे. सद्यपरिस्थिती पाहता पुढील सामन्यात आणखी काही खेळाडूंना संधी मिळू शकते,'' अशी रणनितीही विराटने सांगितली.जिंकणं हीच आमची प्राथमिकता आहे आणि जिंकण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत,'' असंही विराटने स्पष्ट केलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments