उत्तर प्रदेशात तब्बल 10 लाखा विद्यर्थ्यांनी बोर्डाची परीक्षा बुडवल्याची माहिती समोल आली आहे. परीक्षेतल्या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या यूपी सरकारच्या बाडग्याचा हा परिणाम आहे.मागील वर्षी गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होती. यावर्षी सुमारे 66 लाख विद्यर्थ्यांनी 10 वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली.ही परीक्षा 6 फेबुवारीपासून सुरू झाली. 66 लाखांपैकी 15 टक्के विद्यर्थी परीक्षेला बसले नाहीत. ही आकडेवारी गेल्या चार दिवसांतली आहे.अजून महिनाभर परीक्षा सुरू राहणार असल्याने ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments