गेले काही वर्षे मराठा तरुण अस्वस्थ आहे. त्यामुळे अभूतपूर्व मोर्चे निघाले. समाजाचे विराट रुप त्यातून दिसले, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी मोर्चांची तुलना महाभारतातील एका प्रसंगाशी केली.“महाभारतात श्रीकृष्णाने विराट रुपाचं दर्शन दिल्यावर जशी सृष्टी नतमस्तक झाली, त्याप्रमाणे मराठा मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या विराट रुपाचे दर्शन झाले. सरकार या रुपापुढे नतमस्तक झाले आणि त्यामुळे विविध निर्णय घेतले.आणि आज भारताची शान मराठ्यांच्या शौर्यामुळेच टिकून आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले.“मराठा बिझनेसमन फोरमने नोडल एजन्सी म्हणून काम करावे आणि महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एक हजार तरुण उद्योजक बनतील, असे नियोजन करावे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments