Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
राजस्थान आणि पश्चिम बंगाल येथील पोटनिवडणुकी नंतर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. तसेच गुजरातमध्येही काँग्रेसने भाजपला काँटेकी टक्कर दिली. त्यामुळे २०१९ मध्ये चित्र बदलेल असे काँग्रेस च्या नेत्याने म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला चांगले यश मिळू शकेल. गुजरात निवडणुकां मध्ये जे घडले ते लोकसभा निवडणुकांमध्येही होऊ शकते. तसे झाल्यास त्याचा फायदा निश्चितपणे काँग्रेसला होईल आणि भाजपला सत्ता गमवावी लागेल आणि मिळाली तरीही काठावर मिळू शकेल. असा अंदाज काँग्रेस च्या एका नेत्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळाचा नारा देत भाजपसोबत जाणार नसल्याचेच म्हटले आहे. एनडीएतले घटकपक्ष भाजपवर नाराज होत आहेत त्याचा फायदा काँग्रेसला होईल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News
Comments

Recommended