'पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात देश विकासाच्या मार्गावर जात आहे. पण दुसरीकडे आमच्या राज्यात नेमकी याच्या उलट परिस्थिती आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानला विनंती करते की, जम्मू-काश्मीरला युद्धाचा आखाडा बनवू नका. दोन्ही देशांमध्ये मैत्रिचा सेतू बांधा,' असं त्या म्हणाल्या. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळतानाच राज्यातील जनतेची सुरक्षा करण्याचं मोठं आव्हान राज्यातील पोलिसांसमोर आहे, असंही त्यांनी नमूद केलं.दरम्यान, पाकिस्तानने सीमेपलिकडून जोरदार गोळीबार सुरू केलेला असताना मेहबुबा मुफ्ती यांनी हे आवाहन केल्याने त्याला महत्त्व आलं आहे.
0आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments