Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज एकदा त्या घराण्या तील एक अमूल्य हिरा घेऊन मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये विकण्यास गेले. तो हिरा पाहून चार-पाच झवेरी एकत्र आले.ज्याने तो हिरा समोर केला त्याला विचारलं की, 'हा हिरा कुणाचां आहे?' एकानं हळूच परिचय करुन दिला. ‘हे सातारचे भोसले आहेत.’ त्यानंतर त्या हिऱ्याचा लिलाव सुरु झाला.’62 लाखापर्यंत हा लिलाव गेला आणि एकाला राहवलं नाही. तो म्हणाला, त्या व्यक्तीनं त्यांना विचारलं की, ‘तुम्ही सातारचे शिवाजी महाराजांचे वंशज ना?’ ते म्हणाले ‘हो.’ मग विचारलं की, ‘तुम्हाला किती पैशाची गरज आहे?’ ते म्हणाले की, ‘50 लाखांची .’ 62 लाखांपर्यत लिलाव आला होता. ते म्हणाले की ‘हा हिरा तुम्ही परत घेऊन जा. शिवाजी महाराजांच्या संपत्तीचा अशाप्रकारे लिलाव आम्ही करू शकत नाही आणि करुही देणार नाही.' असं श्याम जाजू यावेळी म्हणाले. दरम्यान, श्याम जाजू यांनी वक्तव्याचे पुरावे द्यावेत अन्यथा, भाजपाने जाहीर माफी मागावी.’ अशी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागणी केली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News
Comments

Recommended