Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
'मी भारतात आलो तर तेथील कट्टरतावादी मुल्ला-मौलवींचं काही खरं नाही. एका ट्विटद्वारे त्यांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.भारतात येण्या साठी त्यांनी एक अटही घातली आहे. 'भारतात मला कुणी ऐकणारं आहे का?', असा सवाल करत त्यांनी एक ट्विट केलं आहे. जानेवारी महिना उजाडण्याआधी माझ्या या ट्विटला १० हजार रिट्विट मिळाले तर मी भारतात येईन,' असं त्यांनी म्हटलं आहे.ताहिदी यांचं हे ट्विट अवघ्या दोन दिवसांत १६ हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. त्यामुळं ते आता भारतात कधी येणार आणि कट्टरतावाद्यांविषयी काय विचार मांडणार,' याविषयी उत्सुकता आहे.ताहिदी हे धर्मांध मुस्लिमांवर व मुस्लिम संघटनांवर सातत्यानं टीका करत असतात. जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की ते जगातील इमामांवर हल्लाबोल करतात. त्यांना त्यासाठी दोष देतात. 'सर्वसामान्य मुस्लिमांना जिहादी चिथावण्या देण्याचं बंद करा', असं आवाहन केलं होतं.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News
Comments

Recommended