सुरतमधील एका दानशूर हिरे व्यापाऱ्याने पितृछत्र हरवलेल्या २५१ मुलींच्या लग्नाचा सर्व खर्च करत थाटामाटात या मुलींचे लग्न लावले आहे. महेश सवानी असे या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे.या सामूहिक विवाह सोहळ्यात कशाचीही कमी पडणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.मागील पाच वर्षांपासून महेश सवानी यांनी ९६९ मुलींची लग्न लावून दिली आहेत. मला दोन मुले आहेत. मला एक मुलगी असावी असे कायम वाटायचे पण माझ्या नशिबात ते भाग्य नाही. तरी या सर्वजणींना मी माझ्या मुलीच समजतो. मीही त्यांना वडिलांसारखाच आहे. आणि या मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद पाहून खूप बरं वाटतं, असं सवानी सांगतात. त्याचप्रमाणे कन्यादानासारखं दुसरं पवित्र कार्य नाही असं ते सांगतात . विशेष म्हणजे केवळ लग्नाचा खर्च न करता त्यांनी प्रत्येक नववधूला खास भेटवस्तूही दिल्या आहेत. घरगुती वापराचे इलेट्रिक सामान, फर्निचर, सोन्या चांदीच्या दागिन्यांची भेट त्यांनी प्रत्येक मुलीला दिली आहे. लग्न करुन दिल्यानंतरही सवानी या मुलींची काळजी घेतात. गरोदरपणात तसेच बाळंत पणा साठी येणाऱ्या खर्चा बरोबरच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च सवानी करतात.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments