Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
उद्धव ठाकरेंनी तोंड बंद केलं नाही तर उद्धव यांनी बाळासाहेबांना काय काय त्रास दिला हे भविष्यात उघड करेन, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपण नाही तर उद्धव ठाकरे यांनीच जास्त त्रास दिला, अशा शब्दांत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी हल्लाबोल केलाय. तसंच मध्यावधीची शक्यता नाकारता येत नाही असंही राणेंनी म्हटलंय. दरम्यान, नारायण राणे यांनी त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याचं कोल्हापुरात अनावरण केलं. भगवा,निळा आणि हिरवा या रंगाना झेंड्यामध्ये स्थान देण्यात आलंय. त्यात मध्यभागी पांढऱ्या रंगाची वज्रमुठही आहे. दिलेला शब्द पाळणार हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं ब्रीद वाक्य आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News
Comments

Recommended