ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवरील बोटींचे नुकसान झाले आहे. तसंच किनारपट्टीवरील घरे पाण्याखाली गेली आहेत. हर्णे, पाजपंढरी, आडे, उटंबर बुरोंडी किनारपट्टीवर रात्री समुद्राला आलेल्या उधाणामुळे काही ठिकाणी समुद्राचे पाणी घरांमध्ये शिरले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचेही नुकसान झालं आहे.
Comments