Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
केंद्र सरकारने विविध योजनांसाठी आधार सक्‍ती केली आहे. या विरोधात देशातून अनेकदा आवाजही उठत असतो. आधारमुळे गोपनिय माहिती चोरली जाण्याच्या धोक्याचीही चर्चा होत असते. मात्र, या माहितीमुळेच देशात हरवलेली 500 मुले सापडली आहेत.

आधारकार्डमुळे हरवलेली ५०० मुले सापडल्याचा दावा युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडियाचे (यूआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी केला आहे. या मुलांना विविध ठिकाणच्या अनाथ आश्रमात ठेवण्यात आले होते. त्यांची बायोमॅट्रिक पद्धतीने ओळख पटवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News
Comments

Recommended