काही वर्षांपूर्वी 'देवीचा रोगी काळवा आणि 100 मिळवा' या योजनेचे अनेक रेखाटने महाराष्ट्राच्या जनतेस कल्पना आहे. पण आता तेलंगणा सरकारने राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी एक अनोखी योजना प्रत्यक्षात आणली आहे. या योजनेतंर्गत भिकाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला सरकारतर्फे 500 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना 1 डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले.
ग्रेटर हैदराबाद महापालिका व राज्य सुधारात्मक प्रशासन संस्था यासाठी एकत्रितरीत्या काम करणार आहेत. यासाठी सध्या राज्यात बेघर असलेल्या असंख्य भिकाऱ्यांना शासकीय आश्रयस्थानात ठेवण्यात आलं आहे. ही योजना यापुढेही सुरु राहणार असल्याचे तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले. तेलंगणातील चंचलगुडा तुरुंग व चेरलापाली तुरुंगाजवळील आनंद आश्रमात रस्त्यावर भीक मागणाऱ्यांपैकी 111 पुरुष, 91 महिला आणि 10 चिमुकल्यांना आतापर्यंत या आश्रयस्थानात ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या अंगठ्याचे ठसे व फोटो घेण्यात आले आहेत. पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षानेही या सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी होईल, असा अंदाज सर्व स्तरातून व्यक्त होताना दिसत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments