Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
गेल्या वर्षाच्या तुलनेत 2017 मध्ये काश्मीर खोऱ्यात दगडफेकीच्या घटना 90 टक्क्यांनी घटल्या आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीर चे पोलीस प्रमुख एस.पी,वैद यांनी दिली. कायदा सुव्यवस्था स्थिती सुधारण्याचे श्रेय त्यांनी काश्मिरी जनतेला दिले. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीत झालेल्या या सुधारणांमागे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे छापे हे एकमेव कारण नाही, तर नोटबंदी, बड्या दहशतवादी कमांडर्सवर झालेली कारवाई अश्या अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत. पूर्वी एका दिवसात दगडफेकीच्या 40 ते 50 घटना घडत असत. आता कित्तेक आठवडे दगडफेकीच्या घटना घडत नाहीत. लोकांच्या मनस्थितीत हा खूप मोठा फरक झाला आहे. त्यांना अश्या हिंसाचारातील, आपल्या स्वतःच्या मालमत्तेचे नुकसान करण्यातील तसेच आपल्याच समाजाचा भाग असलेल्या पोलिसांना लक्ष करण्यातील
फरक कळला आहे.

Category

🗞
News
Comments

Recommended