अन्न, वस्त्र, आणि निवारा ह्या मानवाच्या मुख्य गरजा असल्या तरी आज त्यात अनेक इतर
गोष्टींनी सुद्धा प्रवेश केला आहे. ह्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांने अनेक प्रश्नांची
उत्तरे दिली. ते म्हणाले कि आमची प्राथमिकता कृषी आणि रस्ते बांधणी ला आहे. शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीनंतर अनेक बदल दिसू लागतील. जलयुक्त शिवार योजने मुळे महाराष्ट्रात मुबलक
पाणी उपलब्ध होणार आहे. शिवाय ट्रान्सहार्बर रस्त्याचा 22 कि. मी. चा भाग समुद्राच्या गर्भातून
जाईल. ट्रान्सहार्बर आणि कोस्टल रोड ह्या योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून हीरवा
कंदील मिळाला आहे. येत्या काही महीन्यात ह्या दोन्ही परीयोजनांचे भूमिपूजन होईल. कोस्टल
मार्गाचा एक हीस्सा बी.एम.सी. तर दुसरा हीस्सा राज्य सरकार पूर्ण करणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Comments