तेजस ट्रेन मधल्या न्याहारी नंतर अनेक यात्रींना विषबाधा
गोआ ते मुंबई च्या मध्ये धावणारी तेजस एक्सप्रेस ह्या ट्रेन मध्ये प्रवाशांना न्याहारी नंतर अचानक उलट्या होऊ लागल्या. विषबाधा झाल्याचे लक्ष्यात आल्या नंतर २६ प्रवाशांना चिपळूण नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यात तीन लोकांची परिस्थिती नाजूक आहे. ह्या सुपर फास्ट ट्रेन मध्ये आईआरटीसी केटरिंग सर्विस देते. त्यांच्या अनुसार ते ट्रेन मध्ये खाद्य पदार्थ बनवत नसून. खाद्यपदार्थांचा ऑउटसोर्स केला जातो..रत्नागिरी स्टेशन मधून ट्रेन निघाल्या नंतर काहीच वेळाने लोकांना त्रास होऊ लागला आणि उलट्या होऊ लागल्या. संगमेश्वर नंतर प्रवाशांच्या त्रासात वाढ झाल्या मूळे चिपळूण स्टेशन वर डॉक्टर आणि ऍम्ब्युलन्स ची व्यवस्था करण्यात आली. तेजस एक्सप्रेस मधून फूड सॅम्पल घेण्यात आले आहे.. रेव्ले सूत्रांच्या प्रमाणे प्रवाशी आता गंभीरते च्या बाहेर आहे.
Comments