नाशिक - सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीनस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असून ते एक देखावा ठरत असल्याचे दिसून येत आहे. प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणेदेखील खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात.