कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याचा जामीन अर्ज याआधी दोनवेळा फेटाळल्यानंतर तिसऱ्या वेळी मंजूर केला, तर आज कायदेशीर कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर सायंकाळी ५ वाजून १0 मिनिटांनी त्याची कळंबा कारागृहातून मुक्तता करण्यात आली. जामीन मिळताच त्याने खासगी वाहनातून सांगलीकडे प्रयाण केले. सुमारे २१ महिन्यांनंतर त्याची कारागृहातून मुक्तता करण्यात आली.
Comments