Rain Updates Kolhapur : राजाराम बंधारा पाचव्यांदा पाण्याखाली;घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
Kolhapur : गेल्या दोन दिवसापासून पावसाने कोकणासह , कोल्हापुरात जोर धरला आहे. मुसळधार पावसाने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. आज सकाळीच राजाराम बंधारा पाचव्यांदा पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील ऊस, भात, भुईमूगासह इतर कडधान्यांच्या पिकाला दिलासा मिळाला आहे. पंधरा दिवस पावसाने एकसारखी उघडीप दिल्यामुळे माळरानातील पिकांना पाणी देणे गरजेचे होते
व्हिडिओ- नितीन जाधव
#kolhapur
Comments