राज्यातील अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना चिक्की पुरवठ्याबरोबर इतर वस्तूंचं वाटप करण्यासाठी कंत्राट देण्यात आलं होतं. या प्रकरणात घोटाळा झाल्याच्या आरोपांवरून अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला होता. या प्रकरणावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
'इतर वेळी मिठाईत दर्जाहीनता आढळली तरी गुन्हा दाखल केला जातो. मग या प्रकरणात लहान मुलांना निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचा पुरवठा झाल्याचा आरोप असताना अद्याप गुन्हा दाखल का नाही?', असा सवाल खंडपीठानं सरकारी वकिलांकडे केला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाकडून यासाठी कंत्राट देण्यात आलं होतं. यात अनियमितता आणि गैरव्यवहार झाला. तसेच, खरेदी प्रक्रियेत 206 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. अहमदनगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागानं केलेल्या तपासणीत अंगणवाड्यांमध्ये पुरवठा झालेली चिक्की निकृष्ट असल्याचंही निष्पन्न झाले', असा आरोप करणारी जनहित याचिका संदीप अहिरे यांनी केली होती.
#pankajamunde #chikkiscam #chikkiscammumbai #pankajamundenews #mumbai #mumbainews #mumbailivenews
Comments