Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
कोकणाला यंदा गणेशोत्सवाचे वेध जरा लवकरच लागले आहे. याचे कारण आहे कोरोना. यंदा मुंबई-पुणेकर लाखो चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी गणपतीला येता येईल का त्याची चिंता सतावते आहे. अनेक वर्षभर बंद असणाऱ्या घरांमध्ये चाकरमानी चतुर्थीला येवून गणेशोत्सव साजरा करतात. त्या घरांची कुलपे उघडणार का? अशी चिंता त्यांना सतावत आहे. कित्येक घरांमध्ये म्हातारे आई-बाप कॅलेंडरकडे आणि आपल्या मुंबई-पुण्यात स्थिरावलेल्या लेकरांकडे डोळे लावून आहेत. प्रशासन याबाबत धोरण ठरवण्याचा विचार करत असले तरी चित्र अजूनही अस्पष्ट आहे.

रिपोर्ट - शिवप्रसाद देसाई

Category

🗞
News

Recommended