ई सकाळशी बोलताना सिद्धार्थ म्हणाला, आम्ही एलिमिनेट झालो त्यावेळी आमच्या परफॉर्मन्सला 30 पैकी 30 गुण मिळाले होते. तरीही आम्हाला बाहेर पडावे लागले. कारण आम्हाला खूप कमी व्होट मिळाले. तेव्हा आमच्या लक्षात आले की दर्शकांनी व्होट करणेही तितकेच गरजेचे आहे. व्होट करण्यासाठी फक्त मिस कॉल द्यायचा आहे. आम्ही आमच्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये आमचं मराठीपण जपले आहे. म्हणूनच आम्ही आमचा पहिला परफॉर्मन्स झिंगाटवर केला. आमचे पुढचे सगळे नाच हे मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असेच असतील.
Comments