शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी करत स्वामीनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारून तात्काळ शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतत्वाखाली निघालेल्या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्या आसूड यात्रेला गुजरात पोलिसांनी गुजरातमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तणावाचे वातावरण असून यासंबंधी राज्य सरकारने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
Comments