Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
शाळेत दाखल झालेले मूल पहिल्याच दिवशी भांबावते जर त्याला शिक्षकांची भाषाच समजली नाही तर,. ‘हे शिक्षण आपल्यासाठी नाही,’ असा समज करून कळत-नळकत शिक्षणापासून फारकत घेते. तसाच काहीसा प्रकार आदिवासी विद्यार्थ्यांबाबतही होत होता. केवळ बोलीभाषेच्या अडचणीमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहत होते. शिक्षणाशी होणारी ही ताटातूट दूर करण्यासाठी आता आदिवासींना त्यांच्याच भाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून शैक्षणिक साहित्य विकसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मुख्यत्वे गोंड,कोलाम, माडीया,परधान इत्यादी जमातीचे लोकं वास्तव्यास आहेत. त्यांची बोलीभाषा "गोंडी" आणि "माडिया" आहेत. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आदिवासी विकास विभाग काम करते. गडचिरोली प्रकल्पातील आश्रम शाळांमध्ये आता यापुढे गोंडी आणि माडिया भाषेतून शिक्षण दिले जाणार आहे.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended