कोकण म्हंटलं कि बरेच निसर्ग रम्य दृश्य आपल्या डोळ्यासमोरून जायला लागतात. सगळीकडे पसरलेली हिरवळ... केसांना स्पर्श करून जाणारा गार गार वारा .. सगळीकडे हवी असलेली शांतता, पक्ष्यांची तेवढी किलबिल..
डॉल्फिन, सीगल्स बरोबरची सफर आणि नजर पोहोचत नाही तिथपर्यंत सुंदर आणि स्वच्छ असा समुद्रकिनारा. सोबत कोकणच्या रान मेव्याची जोड आणि प्रसिद्ध अशा खाद्यपदार्थांची मेजवानी जर असेल तर त्यापेक्षा मोठं सुख जगात नाही असं वाटायला लागतं... जर तुम्हालाही अशाप्रकारचं कोकण अनुभवायचं असेल तर चला मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे समुद्रकिनाऱ्यावर....
आजच्या धावपळीच्या जगात जर थोडा विसावा शोधताय आणि जवळपास weekend ला जाता येईल अस निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जाणारं ठिकाण तुम्ही शोधताय तर मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे बीच हे तुमच्यासाठी बेस्ट option आहे. आजच्या तरुणाईला मुंबई आणि गोव्याचे बीचेस ओव्हररेटेड वाटतात .. त्यांना सतत काहीतरी नवीन, undiscovered, कमी गर्दीच ठिकाण जिथे शांतता पसरलेली असेल अशा ठिकाणी जायला आवडतं .. त्यामुळे तुमच्या बकेटलिस्ट मध्ये भोगवे बीच नसेल तर कोकण चा सैरसपाटा अर्धवट राहिला म्हणून समजा .... का??? तर याला कारणही तेवढच सॉलीड आहे. आशिया खंडातील सर्वात नयनरम्य, स्वच्छ व सुंदर सागर किनारा म्हणून ब्ल्यू stage मिळालेल्या वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे बिचला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.
आणि येथील नयनरम्य दृश्य टिपलीत आमच्या लोकमत- सिंधुदुर्ग आवृत्तीच्या हॅलोचे प्रमुख महेश सरनाईक यांनी... !! चला तर मग लोकमत सोबत भटकंती करायला तयार व्हा.. निवती किल्याची पाठीमागील बाजू कॅमेरा बद्ध, पर्यटकांसाठी ठरणार माईलस्टोन...
हि दृश्य बघून लगेच बॅगपॅक करून निघायला पाहिजे अस तुम्हाला सुद्धा वाटत आहे ना?? तर मग त्यासाठी तिथे जायचं कसं हेसुद्धा माहिती करून घ्या.. या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी सर्वात जवळच स्टेशन आहे कुडाळ रेल्वेस्टेशन. मुंबईपासून ते भोगवे बीच अंतर आहे ५६० km..तारकर्ली आणि देवबाग पाठोपाठ भोगवे बिचवर जाण्यासाठी पर्यटक आतुरलेले असतात. अशा पर्यटकांना निवती किल्ल्याच्या पाठीमागील भोगवे किनारपट्टीवर जाण्याची संधी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्षात गाडी जात नसली तरी भोगव?
Comments