अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्याकडून संताप व्यक्त | Lokmat News

  • 3 years ago
कल्याण-शहराच्या पूर्व भागातील आडीवली ढोकली परिसरातील चाळ परिसरात पावसाचे पाणी शिरले आहे. जवळपास 1oo घरांना पावसाच्या पाण्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरीकांचे पावसाने हाल केले आहेत.
आडीवली ढोकळी परिसर हा सखल भाग आहे. पहिल्या पावसातही या परिसरात पावसाचे पाणी विविध भागात शिरले होते. आज बुधवार सकाळपासून जोरदार पाऊस सुरु ्असल्याने विजय पाटील नगर, ऑस्टीननगर, गणोश चौकात पाणी साठले आहे. या परिसताली चाळवजा घरात पावसाचे पाणी शिरले आहे.

पावसाच्या पाण्याचा फटका 1क्क् घराना बसला आहे. या परिसराचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली. पावसाचे पाणी घरात शिरल्याने महिलांना दुपारचे जेवण करता आले नाही. तसेच मुलांची शाळा बुडाली आहे. पाटील यांनी पाणी शिरलेल्या घरातील काही कुटुंबा त्यांच्या कार्यालयातील काही गाळे उघडे करुन त्याठिकाणी तात्पुरते राहण्याची त्यांची व्यवस्था आहे. तसेच काही घरातील नागरीकाना दुपारच्या जेवणाचे फूट पॅकेट दिले आहेत.

या भागात पावसाचे पाणी साचते याविषयी प्रशासनाकडे यापूर्वीही तक्रार केली होती. मात्र प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. मागच्या वेळेसही पावसाच्या पाण्याचा निचरा किमान तीन दिवस झालेला नव्हता. आजही पावसाचे पाणी घरात शिरल्याने या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या जलनिस्सारण विभागातील अधिकारी साधी पाहणी करण्यासाठीही त्याठिकाणी पोहचलेले नाहीत. याविषयी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#Kalyan #LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended