Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना गिरकी घायला भाग पडणारा टीम इंडियातील “ चायनामन” कुलदीप यादव ने आपल्या आयुष्यातील निराशेचा टप्पा किती कठीण होता , याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. एकेकाळी मी सुद्धा खूप निराश झालो होतो. त्यावेळी आत्महत्येचा विचार हि मनात आला होता. असे त्याने सांगितले. 12 वर्षाचा असतांना 15 वर्षाखालील संघात मला खेळायचे होते. पण संघात निवड न झाल्याने निराश झालो होतो. एका वाहिनीवरील मुलाखतीत त्याने बालपाणींच्या आठवणींना उजाळा दिला. त्या निराशेतून वडिलांनी बाहेर काढले. आपल्या मुलाने मोठा क्रिकेटर व्हावे असे वडिलाचे स्वप्न होते. मला वेगवान गोलंदाज व्हायचे होते पण प्रशिक्षकांनी मला फिरकी गोलंदाजाचे प्रशिक्षण दिले अशी माहिती हि त्याने दिली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News
Comments

Recommended