महेश चेमटे/लीनल गावडे
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीतील दैनंदिन जीवनात अतिरेकी हल्ल्याची भीती मनात ठेवूनच नागरिक आपले व्यवहार पूर्ण करतात. स्वदेशी विद्यार्थ्यांसह विदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती आहे. मात्र सद्यपरिस्थिती लक्षात घेता विद्यापीठाला असुरक्षिततेची शिक्षा का, असा सवाल निर्माण होत आहे. मुंबईला हादरवून टाकणाऱ्या २६/११ हल्ल्याच्या आठ वर्षांनंतरही परिस्थिती जैसे थे आहे. युवा वर्गाची रेलचेल असलेल्या मुंबई विद्यापीठात सुरक्षिततेचा सावळा गोंधळ आहे.
Comments