चेतन ननावरे, मुंबई - : आठ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादीहल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. १० दहशतवाद्यांनी मुंबईच्या सागरी किनाऱ्यातून प्रवेश करून अंधाधुंद गोळीबार करत देशाची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे, याची प्रचिती करून दिली. मात्र त्यानंतर सुरक्षा यंत्रणेची चौकशी, अहवाल आणि अहवालांवर चर्चाच झाली. कारण हल्ल्याच्या आठ वर्षांनंतरही राज्याचा गाडा हाकणारे मंत्रालयच असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे.
Comments